नव्याने खुलणारं प्रेम हे प्रत्येक जोडप्यासाठीच एक वेगळाच अनुभव असतो. दोघेही यात नवीन असल्याने एकमेकांशी कसं वागावं? नातं कसं घट्ट बांधून ठेवावं याबद्दल ब-याचदा त्यांना कल्पना नसते. मग अशावेळी कसं वागावं हे जाणून घ्या या लेखातून!
नव्याने प्रेमात पडलेल्या आणि नवं नात जुळलेल्या जोडप्यांना प्रेमात नक्की कसं वागावं हे माहित नसतं, अर्थात यात त्यांची काही चुकी नाही. अनुभव आला की त्यांना बऱ्याच गोष्टी कळतात. पण या अजाणतेपणामुळे त्यांच्याकडून बऱ्याच चुका सुद्धा होतात. आपल्या पार्टनरशी कसं बोलावं, त्याला कसं समजून घ्यावं, काही समस्या असल्यास कशी दूर करावी या गोष्टी माहित नसल्यामुळे अनेक चुका होत जातात आणि त्याचा थेट परिणाम नात्यावर होऊन नातं देखील तुटू शकतं. रिलेशनशिपच्या सुरुवातीला कसं वागावं? नातं कसं फुलवावं हे माहित असेल आणि कोणत्या चुका टाळाव्यात याबद्दल जाणीव असेल तर पुढचे धोके टळेल जातात आणि नातं अधिक प्रेमळ होतं. तसेच पार्टनरला सुद्धा विश्वास बसतो की आपण योग्य जोडीदाराची निवड केली आहे. चला तर आपण जाणून घेऊया अशा कोणत्या चुका आहेत ज्या नवीन कपल्सनी अजिबात करू नयेत.
नव्याने प्रेमात पडलेले कपल्स बऱ्याचदा एकमेकांवर हक्क आणि अधिकार गाजवू लागतात, अर्थात सामान्यत: ही भावना आपला जोडीदार आपल्यापासून दूर जाऊ नये, आपण त्याला गमावू नये यातून निर्माण होते. अनेक प्रकरणात असे दिसून आले आहे की असा अधिकार गाजवणे हे कपल्सना सुरुवातीला आवडू लागतं, पण जसा जसा काळ सरता जातो तस तसा त्यांना या गोष्टीचा कंटाळा येऊ लागतो. आपल्या जोडीदाराने आपल्या गोष्टींवर अधिकार गाजवणे ही गोष्ट त्याला त्रासदायक वाटू लागते. याचा थेट परिणाम नात्यावर होऊन नातं बिघडू शकतं.
अनेकदा असं दिसून येतं की प्रेम करणारे लोक एकमेकांसमोर आपल्या भावना व्यक्त करण्याची घाई करतात. आता या भावना म्हणजे कोणत्या? तर पहिल्या दुसऱ्या भेटीतच मी आयुष्यभर तुला साथ देईल, सात जन्म तुझ्यासोबत राहीन अशा आणाभाका घेणे किंवा लग्नाची मागणी घालणे होय. अजिबात या भावना व्यक्त करताना घाई करू नका कारण तुम्ही तुमच्या जोडीदाराला नीट ओळखत नसता आणि अश्यावेळी त्याला नीट जाणून न घेता आयुष्यभर त्याच्या सोबत राहण्याचे वचन त्याला देणे चूक आहे. पुढे जाऊन हा आपला जोडीदार होण्या योग्य नाही असंही तुम्हाला वाटू शकतं. म्हणून भावना व्यक्त करताना घाई करू नका.
नव्याने रिलेशनशिपमध्ये आल्यावर कधीच आपल्या पार्टनर कडून जास्त अपेक्षा लगेच ठेवू नयेत. कधी कधी कपल्स असा विचार करतात की जसं आपण आपल्या जोडीदाराबाबत फील करतो तसचं आपला जोडीदार सुद्धा आपल्याबाबतीत फील करतो. पण मनुष्याच्या मनाची शाश्वती कोणी देऊ शकत नाही. त्यामुळे आपल्या जोडीदाराकडून कधीच अपेक्षा ठेवू नये. किमान ५-६ महिने ती व्यक्ती तुमच्यावर प्रामाणिकपणे प्रेम करत नाही तोवर तरी अपेक्षा ठेवणे चूक आहे.
बऱ्याचदा असं होतं की तुम्हाला न आवडणाऱ्या गोष्टी तुमचा जोडीदार करत असेल आणि तुम्ही तुमच्या जोडीदाराला सारखे ओरडत असाल, पण असं अजिबात करू नका. कारण अशाने तुमचा जोडीदार तुम्हाला कंटाळू शकतो. नात्याच्या सुरुवातीच्या काळात नात्याचे बंध नाजूक असतात आणि अशा वागण्यामुळे ते बंध तुटायला जास्त वेळ जात नाही. कारण हे असं वागणं म्हणजे तुम्ही आपल्या जोडीदाराला स्वत:च्या मुठीत ठेवताय असं प्रतीत करतं.
नवीन रिलेशनशिपमध्ये आपण आपल्या जोडीदाराला जास्त ओळखत नसल्याने अनेक गोष्टींबाबत आपल्याला शंका येऊ शकते. पण अशावेळेस थेट जोडीदारावर आरोप करून अविश्वास दाखवणे चुकीचे आहे. यातून तुमचा त्यांच्यावर अजिबात विश्वास नाही असे त्यांना वाटू शकते. जोवर तुमच्या हातात एखाद्या चुकीच्या गोष्टीबाबत ठोस पुरावा नसले तोवर त्याबद्दल जाब विचारू नये. जास्तीत जास्त विश्वास ठेवावा, अशामुळे जोडीदाराच्या मनातही तुमच्याबद्दल आदर निर्माण होऊ शकतो. तर मंडळी तुम्ही नवीन रिलेशनशिप मध्ये असाल तर या गोष्टी आवर्जून लक्षात ठेवा आणि आम्ही सांगितलेल्या या चुका टाळून आपलं नातं अधिक यशस्वी करा.
0 टिप्पण्या